मडगाव : गोमंतकीयाच्या जेवणामधून कोणीही मासे काढू शकत नाही, कोविड चा ‘कर्फ्यू’ असू दे नाहीतर ‘लॉकडाउन’.
सरकारी अधिकाऱ्यांनी मडगावमधील घाऊक मासळी बाजार बंद ठेवला असला ,तरी त्याचा व्यवसाय नेहमीप्रमाणेच आजही सुरूच आहे.कारण २० हून अधिक माशांनी भरलेल्या ट्रक गोमंतकीयाची भूक भागवण्यासाठी तेथे नियमित प्रवेश करतात
लांब वाहतुकीमुळे मासे खराब होण्यापासून रोखण्यासाठी ‘इन्सुलेशन ‘ लावलेले अनेक ट्रक,बहुतेकदा दिवसाच्या उत्तरार्धात किंवा मध्यरात्रीच्या आधी पोळे व पत्रादेवी सीमेवरुन गोव्यात दाखल होतात.
एप्रिलच्या मध्यापासून मेच्या सुरूवातीस कोविड प्रकरणांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याबद्दल मोठ्या टिकेमुळे गोवा सरकारने 9 मेपासून राज्यात कर्फ्यू जाहीर करण्यास घाई केली असून ते31 मेपर्यंत वाढविण्यात आले आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार मडगावमधील घाऊक मासळी बाजार 9 मेपासून बंद आहे.परंतु माशांचा घाऊक विक्री थांबलेली नाही किंवा गोमंतकी्यांना त्यांच्या मुख्य आहारापासून वंचित ठेवले नाही, असे स्थानिक म्हणतात.
पोळे चेक पोस्टवर ‘क्यूसीआय’ कडे (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) केलेल्या चौकशीत असे आढळले आहे,की दररोज सरासरी २० ट्रक गोव्याच्या प्रदेशात मासे घेऊन येतात.
‘क्यूसीआय’ प्रयोगशाळेत फॉर्मेलिनच्या अस्तित्वाबद्दलची चाचणी घेतल्यानंतर या ट्रकना राज्यात प्रवेश करण्यासाठी मान्यता दिली जाते. मात्र, घाऊक मासळी बाजार बंद असताना हे ट्रक कुठल्या ठिकाणी जात आहेत, अशी शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या माशांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ड्रायव्हर व क्लीनर यांच्याकडे केलेल्या चौकशीत असे आढळून आले की, हे मासे वेगवेगळ्या नव्या व लहान स्थानांवर विक्री करतात.काहींनी माहिती दिली की घाऊक मासळी मार्केटच्या पश्चिमेस बायपासवर विक्री केली जाते तर इतरांनी ते पूर्वीच्या बायपासवर पावर हाऊस जंक्शन येथे विक्री होत असल्याचे सांगितले.
ही संपूर्ण प्रक्रिया सकाळी 4 वाजता सुरू होते आणि सकाळी 6 वाजेपर्यंत हा अनधिकृत बाजार गुंडाळला जातो. या बेकायदेशीर माशे विक्रीची माहिती विक्रेते व खरेदीदार वगळता कोणालाही नसल्याचे अनेकांनी सांगितले.
घाऊक मासे बाजारात जे लोक आधी येत होते,आता तेच लोक येतात , अशी माहिती एका एजंटने दिली.
ही एक छान छुपी प्रणाली असून,सकाळी 7 वाजेपर्यंत माशे गोव्याच्या कानकोपऱ्यावर पोहोचले जातात.
गुप्ततेच्या अटीवर मडगाव येथील एका फिश एजंटने या वार्ताहरला सांगितले की, गोव्यला दररोज किमान 250 टन माशाची आवश्यकता असते, एक ट्रक राज्यात 50 टन आणते, तर सरासरी 40 ट्रक शेजारच्या राज्यातून गोव्यात दाखल होतात.
यातील,महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ राज्यातील ट्रक सकाळी लवकर पोहचतात.उर्वरित 50 टन्स स्थानिक लोक आणतात, अशी माहिती त्यांनी दिली.
सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून प्रत्येक दिवस माशांवर गोमंतकीय सरासरी 7.50 कोटी रुपये खर्च करतात.
आता,हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद असल्याने सोमवारी आणि गुरुवारी विक्री अर्ध्याहुन कमी झाली.
परंतु माशांची गोमंतकीयाची भूक अमर्याद आहे आणि ते इतके मोठी आहे की लॉकडाऊन वा नसो आम्हाला गोव्यात मासे प्राप्त करण्यास भाग पाडले जाते.