पणजी :गोयंकारपण वृत्त
बायंगिनी किनाऱ्यावरील तटबंदीच्या बेकायदा बांधकामांबाबत झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, ‘फोमेन्टो रिसॉर्ट्स व हॉटेल्स लिमिटेड’ने स्पष्ट केले आहे की, समुद्रकिनाऱ्यापुढील वाळूचे खच्चीकरण होण्याण्यापासून रोखण्यासाठी केवळ त्यांच्या मालमत्तेतील तटबंदीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
जारी केलेल्या निवेदनात सदर कपंनीने असेही म्हटले आहे,की मागील दोन वर्षात झालेल्या मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान रोखण्याचे उद्दीष्टही या कामामागे आहे. त्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. जलसंपदा विभागाशी सल्लामसलत करून हे काम सुरू करण्यात आल्याचेही त्यात म्हटले आहे.
फोमेंटो समूहाने सांगितले की
“फोमेन्टो पर्यावरण संरक्षणासाठी नेहमीच वचनबद्ध आहे. गोव्याच्या नैसर्गिक संसाधने आणि जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करत राहील.”