मडगाव :गोयंकारपण वृत्त
मडगाव येथे कोविड सुविधा केंद्र स्थापनेसाठी ‘शेडो काऊन्सिल फॉर मडगाव’च्या (एससीएम) सूचना मडगावकरांच्या पसंतीच्या बनल्या असून त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे. विशेष म्हणजे मडगाव नगरपालिकेच्या मालमत्ता / जागा ताब्यात घेऊन जनकल्याणसाठी वापर करावा, अशी मागणी ‘एससीएम’चे संयोजक सॅव्हिओ कुतीन्हो यांनी केली आहे.
‘ एससीएम’ने शनिवारी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि मडगाव पालिकेचे मुख्यधिकाऱ्यांना कोविड सुविधांच्या स्थापनेसाठी तीन जागा सुचविल्या. मालभाट येथे पालिकेच्या मालकीचा परिसर, ईएसआय रुग्णालयाजवळील मडगाव क्रिकेट क्लबचे मैदान आणि पाजीफोंडमधील ‘बीपीएस क्लब’ची इमारतआदींचा वापर करण्यास सुचविले आहे . नंतर त्याच दिवशी तिन्ही स्थानिक आमदार दिगंबर कामत, विजय सरदेसाई आणि रेजिनाल्ड लॉरेनसो यांनी पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.त्यांनी नावेली स्टेडियम आणि फातोर्डा स्टेडियमवर दोन कोव्हीड सुविधा स्थापण्याचा आपला मानस असल्याचे जाहीर केले.
कुतिन्हो म्हणाले, की सर्वसामान्यांचे डोळे उघडले असून ही वस्तुस्थिती आहे की, मडगाव पालिकेच्या मालकीच्या अपोलो रुग्णालयाच्या मागे मालभटमधील एकमजली इमारत कुणाच्या ताब्यात आहे, याविषयी प्रशासन पूर्णपणे अंधारात आहे. तेथे लसीकरण केंद्राची सुविधा मिळावी म्हणून मुख्य अधिकाऱ्यांनी जागेची तपासणी करुन त्या जागेचा ताबा घ्यावा अशी मागणी ‘एससीएम’ने केली आहे.
‘एससीएम’ने आणखी एक खुलासा केला आहे की, पालिकेकडे मूळचे मडगाव पालिकेच्या मालकीचे असलेले 40000 चौरस मीटर जागेचे क्षेत्र आहे, परंतु या मालकीचे कोणतेही कागदपत्र उपलब्ध नाहीत. या भांडाफोडमुळे निश्चितच बऱ्याच जणांचे धाबे दणाणले आहेत,कारण या परिसरातील अनेक मोठी नावे मडगाव क्रिकेट क्लबच्या रूपाने या घोटाळ्यात सामील आहेत.
याशिवाय,खाजगी व्यवस्थापन व कित्येक व्यावसायिक उपक्रम राबविणाऱ्या पाजीफोंडमधील ‘बीपीएस क्लब’ची जागाही केंद्र स्थापन करण्यासाठी चांगली आहे. या क्लबला साधन सुविधा सुधारणांच्या कामांसाठी शासकीय निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
‘एससीएम’चे संयोजक सॅव्हिओ कुतीन्हो म्हणाले की, जेव्हा लोक मरत होते,आणि रुग्णालयात दाखल होण्यासाठी धडपड करीत होते, तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांची कल्पनाशक्ती हरविल्या गेल्या होत्या . म्हणून आम्हाला सूचना मांडव्या लागल्या .
“जेव्हा पहिली लाट आली तेव्हा सर्व काही संथ गतीने घेण्यात आले आणि म्हणूनच लोक आता नव्या समस्यांना तोंड देत आहेत. जेव्हा तिसरी लाट अपेक्षित असेल तेव्हा आपल्याला पुरेशी सुविधा उपलब्ध करून घ्यावी लागेल,” असे कुतिन्हो म्हणाले.
या वस्तुस्थितीची जाणीव करून घेऊन, सरकारने गंभीर कारवाईत उतरले पाहिजे आणि राज्यांतील सर्वात वाईट परिस्थितीची तयारी करावी लागेल. तृतीय लाट अस्तित्त्वात आल्यास कोणत्याही अनुचित परिस्थितीची तयारी करण्यासाठी पालिका आणि शासन यांनी सार्वजनिक / अर्ध-सार्वजनिक जागां ताब्यात घेण्याचे धाडस करतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे कुतिन्हो म्हणाले.