पणजी :गोयंकारपण वृत्त
‘आम आदमी पक्षा’ने (आप )म्हटले आहे की, बेड, ऑक्सिजन, गृह विलगीकरण आणि कोव्हिड व्यवस्थापनाच्या गंभीर कामांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात भाजपा सरकार अपयस आले आहे. यामुळे वेळेवर लसीकरण करणे ही गोवेकरांची एकमेव आशा आहे, असे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.
महाबरे यांनी निराशा व्यक्त केली की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही साध्या सोप्या कामात अडचणी आणल्या आहेत.सरकारने राजकारणाऐवजी लोकांवर लक्ष केंद्रित केले असते तर अशी कामे काही आठवड्यांच्या कालावधीत आटपता आली असती.
उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत भाजप सरकार गोंधळ घालताना दिसला. लस खरेदी आणि प्रशासन करण्याच्या सततच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हांबरे म्हणाले.
“मा. हायकोर्टाच्या खंडपीठाने सरकारच्या स्वत: च्या विधान आणि प्रतिज्ञापत्रांचा संदर्भ घेत बरेच सविस्तर प्रश्न विचारले, परंतु सरकार विश्वासार्ह उत्तरे देऊ शकले नाही.लस उपलब्ध असण्याच्या संख्येबाबत किंवा लसीकरणाच्या संथ गतीबाबत, सरकार बर्याच वेळा स्वत: च विरोधाभास दर्शविते. ”म्हांबरे म्हणाले.
मुख्यमंतत्री सावंत यांनी एप्रिल महिन्यात गोव्यासाठी १५ लाख डोस घेण्याची घोषणा केली होती. त्यातील ५ लाख डोस थेट निर्मात्याकडून घेऊ,याची आठवण करून देताना म्हांबरे म्हणाले की, एक महिन्याहून अधिक काळानंतर जमीनीवरील वास्तव खूप वेगळे असल्याचे दिसून येत आहे.
“१८ ते ४४ वयोगटातील, लसीसाठी उत्सुक असणार्या गोवन तरूणांना कोविन पोर्टलवर दर आठवड्याला अत्यंत मर्यादित ठिकाणी उपलब्ध असलेल्या लसीसाठी स्पर्धा करण्यास भाग पाडले जाते. ४५+ वयोगटासाठी, सरकारने आज उच्च न्यायालयात दावा केला की, त्याच्याकडे सुमारे २.५ लाख डोस उपलब्ध आहेत, पण कोणीही लस घ्यायला येत नाही.तरीही ४५+ वयोगटासाठी निश्चित झालेल्या दुसर्या डोसची नेमणूक रद्द केली गेली आहे, ”म्हांबरे यांनी स्पष्ट केले.
लोकांचे कल्याण करण्याऐवजी भाजपने आपल्या राजकारणावर लक्ष केंद्रित केल्याचा आरोप म्हांबरे यांनी केला. टिका उत्सव कार्यक्रमाचे स्वागत करताना म्हांबरे म्हणाले की, भाजपाचे आमदार बॅनर वर आपला फोटो व कमळाचे चिन्ह निश्चित करण्यासाठी अधिक वेळ घालवत आहेत, याऐवजी लोकांना संघटित करण्यात त्यांनी अधिक वेळ देणे अपेक्षित आहे.
“सावंत यांना लसीकरण केंद्रे बंद करुन, आपल्या हाय कमांडला पेचात टाकायचे नाही.म्हणूनच मर्यादित लसींचा साठा जास्त वेळ चालावा, यासाठी ते प्रत्येक केंद्रावर दिवसाला फक्त १०० डोस देत आहे. यामुळे गोवन युवकांसाठी होणार्या गैरसोयीची आणि जोखमीची त्यांना पर्वा नाही ”,म्हांबरे म्हणाले.
म्हांबरे म्हणाले की, सावंत यांनी आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न न करता, त्याऐवजी दिल्लीतील आप सरकारकडून शिकावे जे दररोज लसीकरण ऑडिट पारदर्शक पद्धतीने करतात.