पणजी:गोयंकारपण वृत्त
अंथरुणावर खिळून पडलेल्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी १५ दिवसांनी फिरती लसीकरण मोहिम राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज केली. येत्या १० दिवसांत ४५ वयोगटावरील सर्वांना लस देण्याचे लक्ष्यही मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील पंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी ठेवले.
राज्यभरातील दोन हजार पंच, नगरसेवक आणि जिल्हा पंचायत सदस्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. प्रत्येक लोकप्रतिनिधीने दर दिवशी १० जणांना लसीकरणासाठी न्यावे,यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहित केले. उद्यापासून आणखीन ३७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गावांतील स्मशानभूमीत कोविड रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास द्यावेत आणि त्यासाठी लागणारी ‘पीपीई कीट ‘आरोग्याधिकारी देतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार ४५ वयवर्षे झाली नसतानाही लस घेता यावी यासाठी लोकप्रतिनिधींना ‘कोविड योद्धा’ म्हणून घोषित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हेही सहभागी झाले होते. यावेळी अनेकांचे मुख्यमंत्र्यांनी शंका निरसन केले.
*भाजप आमदारांकडून रुग्णवाहिका सेवा*
भाजपचे राज्यभरातील 25 आमदार कोविड रुग्णांना तसेच चाचणीनंतर एखाद्याला कोविडची लागण झाल्यास इस्पितळात नेण्यासाठी जनतेला रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस (संघटन) सतीश धोंड यांनी सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी कोविड रुग्णवाहिकेची सेवा तत्काळ उपलब्ध करण्याची सूचना केली आहे. एखाद्याला कोविडची लक्षणे दिसल्यास त्याला स्टेप अप इस्पितळात किंवा कोविड निगा केंद्रात दाखल करण्यासाठीही ही रुग्णवाहिका सेवा मिळणार आहे. सांतआंद्रेतील भाजपचे आमदार श्री. फ्रांसिस सिल्वेरा यांनी यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी अशी खास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे.कोविड लागणीमुळे गृह अलगीकरणात असलेल्या जनतेला अन्न व औषधे पुरवण्याची सुचना भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे.
दरम्यान,माणुसकीच चित्र रेखाटतांना भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी वेळप्रसंग पाहून मदतीचा हात पुढे केला आहे.अॅनजोप्लासीतून नुकत्याच उठलेल्या शुभदा सावईकर,जयकू्ष्ण वेळूसकर,झिलू गावकर,
तसेच सिद्धि परब,संतेोष गावकर यांनी गरजू लोकांसाठी तिरडी बनवण्याचे वंदनीय कार्य केले असल्याचे भाजप गोवा प्रदेश माध्यम विभाग संयोजक यांनी कळवले आहे.