मडगाव -गोयंकारपण वृत्त
देशातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर लगेच देशात इंधनाचे दर वाढू लागले असुन, मागील चार दिवसांत गोव्यात पेट्रोल चे दर ६५ पैसै व डिझेल ८० पैसे प्रतिलीटर वाढले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने सातत्याने इंधन दरवाढ करुन लोकांचा छळ करणे थांबवावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
कामत म्हणाले, की भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परिस्थितीचा सामना काढून त्यांतुन मार्ग काढताना सरकार थकले आहे. कोविडच्या गैरव्यवस्थापनाने लोकांचा कष्टात भर टाकली आहे. जनता मानसीक व शारिरीक तणावाखाली असताना, असंवेदनशील भाजप सरकार त्यांच्यावर इंधन दरवाढीचे अतिरीक्त बोजा टाकत आहे.
भाजपचा अछचे दिनचा फुगा फुटला असुन लोकांना दररोज कष्ट सहन करावे लागतात. गेल्यावर्षी कसलाही विचार न करतात पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जाहिर केलेला देशव्यापी लॉकडाऊन संपुर्ण फसला. देशाची अर्थव्यवस्था कोसळली आणि त्याचा परिणाम प्रत्येक घरगुती जमा-खर्चावर झाला. छोटे व पारंपरिक व्यावसायीकांना त्याचा अधिक आर्थिक फटका बसला. आज देशात लॉकडाऊनची खरी गरज असताना सरकार मात्र वेगळा विचार करते. गोव्यात ‘आवो- जावो घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती सरकारने केली आहे.
राष्ट्रव्यापी लॉकडाऊन संपल्यानंतर देशातील कमजोर घटकांना आर्थिक पाठबळ देणे भाजप सरकारचे कर्तव्य होते. परंतु, भाजप सरकार लोकांना आर्थिक दिवाळखोरीत व कोविडच्या मृत्यूच्या जबड्यात ढकलत आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
आज ज्या प्रकारे दरवाढ होत आहे ते पाहिल्यास पुढिल काही दिवसांत इंधन रू. १०० प्रति लिटर व गोव्यातील कोविड मृतांचा आकडा प्रतीदिन १०० होण्यास वेळ लागणार नाही. लोक भयाने जगत असताना भाजप सरकार मात्र बेफिकीर आहे.जनतेने भाजपचे स्वार्थी राजकारण समजले पाहिजे. त्यांना गरिब जनतेचे पडलेले नसुन, केवळ आपला फायदा बघत आहेत. निवडणूकांच्या वेळी दिलेली आश्वासने सत्तेत आल्या क्षणी ते विसरतात असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.
Keep Reading
Add A Comment