पणजी :गोयंकारपण वृत्त
चक्रीवादळ ‘टॉक्ते’मुळे झालेल्या विध्वंसानंतर केंद्र सरकारने गोवा राज्यास सामान्य स्थितीत पूर्ववत येण्यास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
चक्रीवादळाने गोव्याला धडक दिल्याच्या एका दिवसानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केली.
मुख्यमंत्री म्हणाले,” गोवा राज्यातील ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे होणाऱ्या दुष्परिणाम व विध्वंसांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींशी बोललो. माननीय शहा यांनी चक्रीवादळामुळे राज्यात होणाऱ्या व्यापक नुकसानीची माहिती घेतली. सामान्य स्थिती परत येण्यासाठी सर्व केंद्रीय यंत्रणेमार्फत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ”
सावंत पुढे म्हणाले की, चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या गोमंतकी्यांना सरकार आवश्यक ती सर्व मदत पुरवेल.
मुख्यमंत्रीसावंत यांनी सांगितले की, चक्रीवादळ तौक्तेमुळे नुकसान झालेल्यांना आणि मृत झालेल्यांना आठ दिवसात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे.
चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे दोघा जणांचा जीव गेला आणि १०० हून अधिक घरांचे नुकसान झाले . येत्या 8 दिवसात आपत्ती व्यवस्थापनाद्वारे त्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले
ते पुढे म्हणाले, की गोव्यातील बर्याच भागांचे नुकसान झाले आणि चक्रीवादळानंतर होणारे दुष्परिणाम राज्यातही यापुढे चार दिवस सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“राज्यभरातील किनारपट्टीवरील सर्व कामे रद्द करण्यात आली आहेत.आम्ही नोंदल आणि इतर सैन्याला रस्ते मोकळे करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. ‘एनडीआरएफ’ची टीम राज्यभरात तैनात करण्यात आली आहे. ”
ते पुढे म्हणाले की गोव्यात दोन मृत्यूची नोंद झाली असून 500 हून अधिक झाडे कोसळली आहेत. सुमारे 100 मोठी घरे आणि 100 लहान घरांची नुकसानी झाली. रस्ते अडवले गेले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे, ”ते म्हणाले
सावंत म्हणाले, की राज्यभर वीजपुरवठा पूर्ववत करण्यास दोन दिवस लागतील. कोविड रुग्णालयात वीज खंडित होत नाही. मडगाव आणि थिवी रेल्वे स्थानकांदरम्यान पाच ठिकाणी रेल्वे रुळावर झाडे पडण्याच्या घटना घडल्याची माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. काही गाड्या उशिराने धावत असल्या तरी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीत कोणताही विघटन होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले