पणजी :गोंयकरपण वृत्त
कोरोनाचा वाढत्या प्रसाराच्या भीतीने राज्यातील अनेक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आठ दिवस लॉकडाऊनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाउन करण्यास नकार दिल्याने मंगळवारपर्यंत नगरपालिकांसह २० हून अधिक पंचायतींनी लॉकडाऊन जाहीर केले आहे.या स्वराज्य संस्थाना स्वतःचा बचाव आता स्वतःच करण्याची पाळी आल्याचे वाटत आहे.
तथापि, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ग्रामीण आणि नगरपालिकेच्या भागात वैयक्तिक लॉकडाउन न करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे घबराट निर्माण होऊन लोक बाहेर पडल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे.
मुख्यमंत्र्यांचे निवेदन अशा वेळी आले आहे, ज्यावेळी खबरदारी म्हणून त्यांच्या मतदारसंघातील साखळी पालिकेने लॉकडाऊन जाहीर केले आहे.
सावंत यांनी व्यक्तींच्या हालचालींवर अनावश्यकपणे मर्यादा घालू नयेत आणि लोकांना त्यांच्या अधिकृत कामापासून दूर जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
काही आमदारही या कामात सामील असल्याचा आरोप करून सावंत यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे, की बाहेर जाण्यास परवानगी नसलेले बरेच लोक कदाचित रूग्णालय, औषधनिर्माण संस्था आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत असण्याची शक्यता आहे.
मंगळवारी उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सांखळी, शिवोली, हळदोना, बोगमळो , साळीगाव , पेन्हा द फ्रांका, साल्वाडोर द मुंद , रेईश मागोस,आसगाव , असोळणा, मांद्रे,डिचोली, वेर्ला -कान्का, पर्रा, वेर्णा, वार्का, राय,कुडतरी, नागोआ, कलंगुट, कांदोळी, कामुरलि, असोल्णा , कार्मोना, वेलसाव , वेलिंग-प्रियोळ , बस्तोडा , मोयरा, सांकवळ , चिखली , कुर्टालि, चिंचनि तसेच कुंक्कळी नगरपालिका, मडगाव नगरपालिका,पणजी मनपा आणि कुडचडे नगरपालिका पूर्ण लॉकडाऊन
करण्यात आल्या आहेत. या भागात दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त आवश्यक सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विरोधी पक्षाच्या आमदारानेही मुख्यमंत्री सावंत यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे व कडकनिर्बंध लागू करण्याचे आवाहन केले आहे.
लॉकडाऊन आदेशानुसार,कार्यक्षेत्र हद्दीत जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना सकाळी 6 ते दुपारी 12 या कालावधीत काटेकोरपणे विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्याच्या अगदी दुर्गम भागातील गावकऱ्यानी शहरी भागातील लोकांपेक्षा लॉकडाऊन अधिक गंभीरपणे घेतला असल्याचे आढळून आले आहे.
या खेड्यांनी मोठ्या गटात फिरणाऱ्या लोकांवरही अंकुश लावला आहे. रहिवाशांना बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये आणि सामाजिक अंतर कायम राखण्यास सांगितले आहे.
कोविडच्या दुसर्या लाटेने राज्याच्या बहुतेक प्रत्येक भागात परिणाम केला आहे. राज्याने रोजच्या संक्रमणामध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. सोमवारपर्यंत एकूण सक्रिय प्रकरणे 25,839 होती.सर्वात चिंताजनक म्हणजे दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या. गेल्या काही दिवसांत राज्यात दररोज सरासरी 30 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत 1320 लोकांनी प्राण गमावले आहेत.
Keep Reading
Add A Comment