पणजी:गोयंकारपण वृत्त
कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना ‘होम क्वारंटाईन किट्स’चे वेळेवर वितरण होत नसल्याचा पर्दाफाश करताना, गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची जबाबदारी स्वीकारण्याचे आव्हान दिले आहे.
अॅड. वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले,की बरेच रूग्ण व त्यांचे कुटुंबीय ‘होम क्वारंटाईन किट्स’ बद्दल चौकशी करीत आहेत. लोक आमच्या ‘हेल्पलाइन’ला कॉल करीत आहेत आणि त्यांना ‘होम क्वारंटाईन किट्स’
मिळाली नसल्याने औषधे मिळविण्यासाठी आमची मदत घेत आहेत. किमान त्यांना कोणती औषधे घ्यावी हे सांगितले पाहिजे, जेणेकरुन ते फार्मसीमधून खरेदी करणे शक्य होईल . ”
रुग्णालयांमधील डॉक्टर व इतर कर्मचार्यांच्या कामाचे कौतुक करीत म्हार्दोळकर म्हणाले की, कोविड पॉझिटिव्ह रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय सुविधा सरकार पुरवू शकत नसल्याने डॉक्टर असहाय्य आहेत. निधन झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरले आहे. जेव्हा सरकारला हे माहित होते, की कोव्हीडच्या दुसर्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे, तेव्हा त्यांनी होम क्वारंटाईन किट्ससाठी अधिक ऑर्डर द्यायला हव्या होत्या, तसेच वितरण प्रणालीत सुधारणा करायला हवी होती. पुर्वी रूग्ण कमी होते, पण आता दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. म्हणून होम क्वारंटाईन किट्स वितरणच्या या कामात अधिक कर्मचारी गुंतले गेले पाहिजेत, जेणेकरून ते रुग्णांकडे वेळेवर पोहचेल. ” असे ते म्हणाले.
“पोझिटिव्ह होवून चार किंवा पाच दिवसानंतर ह्या किटस पुरविल्या गेल्या, तर त्याचा काय फायदा होइल.
वितरण यंत्रणेत सुधारणा आणि अधिकाधिक कर्मचार्यांना काम सोपविण्याचे त्यांनी सुचविले आहे. जेणे करुन रुग्णांना त्वरित ही किटस मिळेल आणि त्वरित उपचार सुरु होणे महत्वाचे आहे.
“कोविडच्या या दुसर्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर सरकार खरोखरच गंभीर असेल तर आधी या मुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. होम क्वारंटाईन रूग्णांची तब्येत बिघडल्यावर रूग्णालयात गर्दी होते, कारण त्यांना वेळेवर औषधे मिळत नाहीत. याची कल्पना सरकारला असायला पाहिजे आणि त्या नुसार काम केले पाहिजे” असे ॲड म्हार्दोळकर म्हणाले.
अॅड. म्हार्दोळकर म्हणाले की, असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अधिकारी कोविड होवून गेलेल्या रुग्णांना त्यांनी वापरलेले ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर परत करायला सांगत आहेत. जेणेकरुन नवीन रुग्णाना ते देता येईल. या प्रकाराने हे सिद्ध होते की हे सरकार ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर आणि औषधे खरेदी करण्यात अपयशी ठरले आहे.”
वैद्यकीय अधिकाऱ्यानी केलेले आवाहन लोकांचा जीव वाचवण्यासाठी असल्याने, ॲड म्हार्दोळकर यांनीही आवाहन करताना म्हटले आहे, की यामुळे इतर रुग्णांचे प्राण वाचू शकतात. आता आम्ही या सरकारवर विसंबून राहू शकत नाही, ज्याने सर्व क्षेत्रात गोमंतकीयांचा विश्वासघात केला आहे आणि आता आम्ही हे आरोग्यक्षेत्रातही पाहत आहोत. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडमुळे मरण पावलेल्यांची जबाबदारी घ्यावी.त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे.