पणजी : गोयंकारपण वृत्त
‘आम आदमी पक्षा’ने (आप ) आज प्रमोद सावंत सरकारला केंद्रासोबत हात मिळवणी केल्याबद्दल आणि दुसर्या लाटेत गोवेकरांना प्रथम स्थान देण्यात अपयशी ठरल्याबद्दल फटकारले. ‘आप’ने लक्ष वेधले की राज्य सरकारसाठी लसींची कृत्रिम कमतरता निर्माण करण्यात आली आहे, तर खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात साठा मिळाला आहे, जेणेकरुन लसीसाठी जास्त दर आकारता येईल. ‘नॅशनल जीएसटी कौन्सिल’च्या बैठकीत झालेल्या अपमानात अधिक त्रासाची भर करण्यासाठी, प्रमोद सावंत यांनी काल लसीकरणासह जीवन बचतीची उपकरणे व साहित्य बनविण्यास विरोध केला.
ज्या काळात गोवेकर या महामारीचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहेत, त्या वेळी भाजपा केवळ अडथळे आणण्याचा किंवा संकटातून पैसे कमविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपाचे मूळ घोषवाक्य ” आपदा में अवसर” याचा खरा अर्थ गोवेकरांच्या दु: खाचा फायदा घेणे असा होता कि काय,असे वाटत आहे. राज्यातील १८-४४ वयोगटासाठी विनामूल्य लसीकरण मोहीम कोठेही दिसत नाही.
दरम्यान,अवाढव्य दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांकडे या लसीचा साठा भरलेला दिसतो. जर भाजपने अशा प्रकारचा लस घोटाळा केला नसता, तर अनेक तरुणांचे प्राण वाचले असते.लसींची कमतरता फक्त सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आस्थापनांमध्ये आहे, खासगी रुग्णालयांकडे मोठ्या प्रमाणात पुरवठा आहे.
लसींचा पुरवठा कमी होत असताना, कोरोनामुळे त्रस्त असलेले लोकही भाजपच्या लूटपासून सुरक्षित नाहीत. गोयंकरांना स्वतःची औषधे, ऑक्सिमीटर, ऑक्सिजन सिलिंडर्स स्वतःच आणण्यास भाग पाडले गेले आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत ‘आप’ने लस, ऑक्सिजन सिलिंडर, कन्सेंट्रेटर, व्हेंटिलेटर, टेस्टिंग किट, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर्स, पीपीई किट आणि मास्क करमुक्त घोषित करण्याची मागणी केली. परंतु प्रमोद सावंत यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी याला तीव्र विरोध दर्शविला व कोरोना अत्यावश्यक वस्तूंवर कर भरावा, अशी त्यांनी मागणी केली.
राहुल म्हांबरे म्हणाले की, “लसी आपले प्राण वाचवण्याचे उत्तम साधन आहेत आणि यासाठी केंद्रासमोर उभे राहण्याऐवजी प्रमोद सावंत गोवेकर तरूणाला एकतर जास्त किंमत देऊन लस घ्यायला भाग पाडत आहेत किंवा त्यांना मुळीच लस मिळू नये याची व्यवस्था करत आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा तरुण आणि वयोवृद्ध गोवेकर कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्याकडून कोणत्याही स्वरूपाचा पाठिंबा नसताना सुद्धा एकत्र येत आहेत.अशावेळी सावंत जीवन बचतीच्या वस्तूंवर कर लावण्याचा आग्रह धरत आहेत. आता अशी वेळ आली आहे की, भाजपाने त्यांच्या खिशे भरणे कार्यक्रमाबद्दल विचार करणे थांबवले पाहिजे आणि गोयंकरांबद्दल विचार करण्यास सुरवात केली पाहिजे.