म्हापसा :गोयंकारपण वृत्त
‘आम आदमी पक्षा’च्या (आप ) म्हापसा युनिटने चार दिवसांपासून शहराचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात पूर्णपणे अपयशी आल्याबद्दल भाजपा सरकार आणि खासकरुन त्यांच्या म्हापसाच्या आमदाराचा निषेध केला आहे.
म्हापसा येथील रहिवासी आणि राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, भाजपने म्हापसेकरांची मते मिळविण्यासाठी त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु त्यांनी लोकांना मूर्खात काढत केवळ त्यांना परिवारराज देण्यात आला. आमदार म्हणून घराणेशाहीतील हा लोकप्रतिनिधी पूर्णतः अपयशी ठरला.
“ 100 तासांपेक्षा जास्त वेळ आम्ही म्हापसेकर अंधारात आहोत. निवडणुकीच्या वेळी भाजपाने आश्वासित केलेला विकास हाच आहे का? असे वाटते की म्हापसाला भाजपने अश्मयुगात परत नेले आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया राहुल म्हांबरे यांनी दिली.
म्हांबरे यांनी माजी आमदार दिवंगत फ्रान्सिस डिसूझा यांचा मुलगा जोशुआ डिसूझा पुन्हा एकदा या संकटकाळी पूर्णपणे अनुपस्थित व गायब असल्याच्या औदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त केली. आणि ते म्हणाले की, “स्वत: च्या बंगल्यात वीज जनरेटर चालविला जात असल्याने जोशुआ यांना सर्वसामान्यांच्या दु:खाची काळजी नाही.”
“स्थानिक व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लोक पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत, त्यांना त्यांच्या सदनिकेत बादलीने पाणी आणावे लागत आहे. मुले आणि ज्येष्ठ नागरिक यामुळे विशेषत: प्रभावित झाले आहेत. म्हापसात संपूर्ण गदारोळ माजला आहे. परंतु वडिलांच्या वारशाने आमदारकी मिळविलेले ‘राजकुमार’ जोशुआ मात्र डोंगराच्या माथ्यावर असलेल्या आपल्या किल्ल्यात आनंदाने राहात आहे. त्यांना जनतेची कवडीची किंमत नाही ”, अशी खणखणीत टीका म्हांबरे यांनी केली.
प्रेस नोट नंबर 2
आम आदमी पार्टी
20/05/2021
*आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्ली प्रशासनाचा आदर्श घेऊन अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे कोविडमुळे त्रस्त झालेल्या गोव्याच्या जनतेला दिलासा देण्याचे काम करावे, असे आवाहन केले.*
≠==========
दरम्यान,दिल्लीत केजरीवाल सरकारने केलेल्या योजना राज्यातही भाजपा सरकारने अवलंबन करावी, अशी मागणी आप ने केली आहे.
1) कोरोनाने ज्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, अशा कुटुंबाला ५० हजार रुपयांची सानुग्रह मदत.
2) कोविड दरम्यान ज्या मुलांच्या आई वडिलांचा किंवा दोघांपैकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला असेल, अशा मुलांना प्रत्येकी दरमहा अडीच हजार रुपये सानुग्रह भत्ता वयाच्या 25 व्या वर्षांपर्यंत दिला जाईल. तसेच त्या मुलांचे शिक्षण दिल्ली सरकार मोफत करेल.
3) कुटुंबातील “कमाई करणारा सदस्य” गमावलेल्या सर्व कुटुंबांना भरपाई म्हणून ₹ 50,000/- आणि मासिक पेन्शन ₹ 2500/- मिळतील.
4) ज्यांना गरज आहे, त्या सर्वांना मोफत रेशन दिले जाईल.