फोंडा :गोयंकारपण वृत्त
कोविड महामारीचच्या (साथीचा रोग) सर्वत्र होणाऱ्या विनाशकारी परिणामामुळे आणि त्यानंतर तौकते चक्रीवादळामुळे आपले जीवन व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तातडीने मदत मिळावी,अशी मागणी गोमंतकियानी केली आहे. ‘गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट’च्या (जीएमपीएफ) वतीने गोव्याच्या ग्रामपंचायतींनी गोव्यातील खाणकाम त्वरित पुन्हा सुरू करावे, असे सर्वोच न्यायाल्याकडे अपील केले आहे. राज्यात ही गंभीर परिस्थिती आणि अस्मानी संकटाची परिस्थिती आहे, असे जीएमपीएफचे अध्यक्ष पुती गावंकर यांनी सांगितले.
गोव्यात खाणबंदी लागू झाल्यापासून (मार्च 2018), राज्यातील खाण अवलंबितांचे जीवनमान धोक्यात आले आहे आणि ते समृद्धी आणि आनंदाच्या शोधात आहेत.
“परिस्थितीचे गंभीरता अतिशयोक्तीपूर्ण ठरू शकत नाही किंवा भविष्यातील परिणामही अधोरेखित करता येणार नाहीत. ‘शटडाऊन’ व बंदीमुळे ग्रामस्थांच्या जीवनावर व नेहमीच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे. कोरोना आजार (साथीचा रोग) आणि निसर्गाच्या क्रोधामुळे लोकांचे प्राण कंटाशी आले आहेत. सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने गोमंतकी्यांना भेडसावणा समस्याच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्यासाठी कोणतीही विलंब न करता खाणकाम पुनरुत्थानाची मागणी केली जात आहे , ” गावकर म्हणाले
गोव्याचा जागतिक स्तरावरील प्रख्यात पर्यटन उद्योग खाणकामानंतर दुस ऱ्या क्रमांकाचा देश असून आता तो पूर्णपणे कोसळला आहे.पुढच्या दोन वर्षात तरी त्याचा सुवर्णकाळ दिसणार नाही. राज्य पर्यटन मंत्रालयाने डिसेंबर- २०२० मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार, गोवन टुरिझमचे 7००० कोटीचे रुपयांचे नुकसान झाले आहे; 35% टक्के लोकांनी नोकरी गमावली आहे . आता साथीच्या दुसर्या लाटेने राज्याच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण रचना आणि लोकांचे जीवनमान उध्वस्त झाले आहे, असे ते म्हणाले.
“कोविड च्या दुसर्या लाटेच्या परिणामामुळे गोमंतकी्यांचे त्रास आणखी वाढले आहेत. गोव्यातील खासकरुन खाण पट्ट्यातील लोकांचे जीवनमान पूर्णपणे खालावले आहेत. त्यांना अन्न आणि औषधे या मूलभूत गरजा पूर्ण करणे कठीण वाटत आहे. खेड्यातील लोक सध्या मर्यादित स्त्रोत, कर्ज, तात्पुरते कामे , गोल्ड लोनसह दिवस जगत आहेत. म्हणूनच गोव्यातील खाणकाम त्वरित पुन्हा सुरू करण्याच्या अंतरिम दिशेने आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने राज्यातील जनतेला दिलासा मिळण्याची गरज आहे. ” गावकर म्हणाले
गावकर म्हणतात, की
खाण बंदीमुळे केवळ गोमंतकियाच्या रोजीरोटीवरच परिणाम होत नाही तर राज्याच्या सामाजिक-आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होत आहेत. बंदी होईपर्यंत खाण क्षेत्र हे राज्याच्या तिजोरीला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारे साधन होते.यामुळे मागील 3 वर्षाला 11 हजार कोटीहून अधिक रुपयांचे सरकारला नुकसान झाले आहे.