पणजी :गोयंकारपण वृत्त
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेला 15 दिवसांचा कर्फ्यू अजून लागू होण्याआधीच पणजी शहर महानगरपालिकेच्या (मनपा )नवीन आणि अननुभवी महापौरांनी पणजी मनपा मार्केटला कुलूप ठोकले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी 9 मे ते 24 मे पर्यंत सकाळी 6वाजे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली.
दुपारी 1 पर्यंत जीवनावश्यक वस्तू व किराणा मालाची दुकानें खुली राहणार असल्याने सामान पुरवठायवर परिणाम होणार नाही, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली होती.
तथापि, नवीन आणि अननुभवी पणजीचे महापौर रोहित मॉन्सेरात यांनी पणजी मार्केट व अन्य दुकानें पूर्णपणे बंद केली आहे. कोविड -19 प्रकरणात वाढ झाल्यामुळे किराणा सामान वगळता सर्व दुकाने बंद झाली आहेत.
अचानक झालेल्या या निर्णयाने पणजीवासिय आश्चर्यचकित झाले आहेत, त्यांचे म्हणणे आहे की गेल्या दोन दिवसांपासून त्यांना मासे, कोंबडी किंवा भाज्या मिळाल्या नाहीत.
“आम्हाला काही कळवले गेले नाही. मनपा कामगार आले आणि त्यांनी कोणतीही सूचना न देताच दुकाने बंद केली, असे नाव न घेणाच्या अटीवर एका व्यापाऱ्याने सांगितले.
नियमितपणे बाजारात मासे आणि भाज्या खरेदीसाठी आलेल्यानी अशा “बालिश” निर्णयाबद्दल महापौरांना फटकारले.
“तुम्ही डोक्याचा विचार न करता असा बालिश निर्णय कसा घेऊ शकता? स्थानिक महापौरांनी महिनाभरासाठी साठा केला असावा.मात्र लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, असे स्थानिक रमेश नाईक यांनी सांगितले.
अशा बंदच्या कायदेशीरतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ते म्हणाले, “जेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वत: जीवनावश्यक वस्तू विक्री खुल्या असतील असे सांगितले.तेव्हा महापौरांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे कोणते अधिकार आहेत,” ते म्हणाले.
पणजीच्या एका नगरसेवकानेही बुद्धी न वापरता हा निर्णय घेतल्याबद्दल हसून उत्तर दिले.ते म्हणाले, “महापौरांनी असा निर्णय घेण्यापूर्वी आपली टीम, माजी महापौर किंवा किमान वडील बाबुश मोन्सेरात यांना विचारात घ्यायला हवे.”